Vihir Anudan Grant Yojana : मंडळी शेतकऱ्यांसाठी नवीन विहीर खोदकाम आणि सौर ऊर्जा पंप अनुदान योजना ही शासनाने शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी सुरू केली आहे. योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचा पुरवठा करणे व शाश्वत ऊर्जा वापरातून शेती उत्पन्न वाढवणे हा आहे.
शेतकऱ्यांना या योजनेत विहीर खोदकामासाठी शासकीय अनुदान दिले जाईल आणि 5 एचपी क्षमतेचा सौर ऊर्जा पंप बसवण्याची सुविधाही दिली जाणार आहे. या योजनेसाठी शासनाने ₹1800 लक्ष निधी मंजूर केला आहे. योजनेचा कालावधी एक वर्ष असून ती महाराष्ट्र राज्यात लागू केली जाणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, वनहक्क कायद्याद्वारे वनपट्टा प्रमाणपत्र, जलस्रोत उपलब्ध असल्याचा दाखला, यापूर्वी योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र आणि विहीर खोदकामासाठी पाणी उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांनी ही योजना स्वतःसाठी फायदेशीर ठरवावी आणि आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.