मित्रांनो विदर्भातील काही भागांतील कमाल तापमानात कमी होण्याची अपेक्षा असून, अमरावती, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. या भागांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहण्याची अपेक्षा आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील काही भागांतील तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने घट झालेली आहे. विशेषता कोल्हापूर, नाशिक, सांगली, सातारा आणि सोलापूरसह विदर्भातील नागपूर, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ भागांतील तापमानात कमी होणारे आहे.
तापमानाच्या बाबतीत, मराठवाड्यात धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि बीड या ठिकाणी तापमान ४० अंश सेल्सिअस ओलांडले आहे. पुण्यातील लोहगाव येथे ४२.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. हवामानशास्त्र विभागाने पुढील दोन दिवसांमध्ये परभणी आणि हिंगोलीतील काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.