मंडळी राज्य सरकारने नुकतीच शेतीसाठी दिवसातील वीजपुरवठा सुरू करण्याची ग्वाही दिली असली, तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी आणि शेतीच्या कामात अडथळा येऊ नये यासाठी सरकारने कुसुम योजने च्या धर्तीवर सौर कृषी पंप योजना सुरू केली.
सदर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सौर पंप बसवले. प्रारंभी काही दिवस हे पंप सुरळीत कार्यरत होते. परंतु नंतर पंप बंद पडणे, सौर पॅनलमध्ये बिघाड होणे, तसेच चोरीच्या घटना वाढू लागल्या. अशा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानंतर शेतकऱ्यांनी संबंधित कंपन्यांशी संपर्क साधला, मात्र सेवा वेळेवर मिळत नसल्याने नाराजी वाढत आहे.
सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून वेळेत दुरुस्ती मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या शेतीस पाणीपुरवठा खोळंबतो आहे. विशेषता उन्हाळ्यात ही समस्या अधिक तीव्र होते. अनेक शेतकऱ्यांनी स्थानिक कार्यालयात तक्रारीही नोंदवल्या असून, मात्र त्या तक्रारी प्रलंबितच राहतात.
या परिस्थितीमुळे काही शेतकऱ्यांनी सौर पंपऐवजी पुन्हा वीजपुरवठ्यावर आधारित पंप वापरण्यास सुरुवात केली आहे. सौर पंप नकोतच, असा सूर अनेक शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे सेवा वेळेत न देणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाईची मागणीही जोर धरू लागली आहे.