PM Kisan Yojana : मंडळी केंद्र सरकारने 2019 मध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) सुरू केली होती. या योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये तीन हप्त्यांत दिले जातात. प्रत्येक हप्ता चार महिन्यांच्या अंतराने 2,000 रुपये थेट बँक खात्यात DBT पद्धतीने जमा केले जातात. आतापर्यंत या योजनेचे 19 हप्ते शेतकऱ्यांना वितरित केले गेले आहेत आणि आता शेतकऱ्यांना पुढील हप्त्याची प्रतिक्षा आहे.
याच धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत पाच हप्ते मिळाले आहेत. आगामी अर्थसंकल्पात राज्य सरकार या योजनेत मोठे बदल करणार असून, शेतकऱ्यांना यामध्ये वार्षिक 12,000 रुपये मिळणार आहेत.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत बोगस लाभार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी ईकेवायसी (EKYC) करणे अनिवार्य केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यांचे पुढील हप्ते थांबवले जाऊ शकतात. या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी ईकेवायसी, बँक खात्याला आधार लिंक, आणि आधार सिडींग स्टेटस एक्टिव्ह असणे आवश्यक आहे.
पंतप्रधान किसान योजनेचा पुढील हप्ता 27 मे नंतर शेतकऱ्यांना मिळणार आहे. पात्र शेतकऱ्यांची माहिती 20 मे पर्यंत मागविण्यात आली होती. 19व्या हप्त्यानंतर, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मे मध्ये शेतकऱ्यांना वितरीत होईल, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.
शेतकऱ्यांसाठी हे दोन्ही महत्त्वाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्व संबंधित प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.