मंडळी राज्यात अलीकडेच पडलेला उष्णतेचा तडाखा आता ओसरताना दिसतो आहे. मात्र या उबदारतेनंतर आता नव्या हवामान संकटाची चाहूल लागली आहे. आकाश पुन्हा काळ्या ढगांनी व्यापले असून वाऱ्यांनीही वेग घेतला आहे. उन्हाच्या झळांमधून थोडीशी सुटका मिळत असताना, बळीराजा समजतो तोच ढगांच्या आणि वादळी वाऱ्यांच्या रूपात संकट समोर उभे ठाकले आहे.
अरबी समुद्रावरून येणारे वारे आता सामान्य नसून, त्यांच्यासोबत वीजा, वादळ आणि गारपिटीचा धोका दडलेला आहे. हवामान खात्याने राज्यातील तब्बल पंचवीस जिल्ह्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांची काढणी केली असून काहींनी पेरणीच्या तयारीला सुरुवातही केली आहे. परंतु, असा अचानक बदल होईल याची कुणालाही कल्पना नव्हती. यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण गणितच बिघडू शकते.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस वाऱ्यांची दिशा सतत बदलत राहणार आहे. त्यामुळे ढग कुठेही जमा होऊ शकतात. संध्याकाळच्या वेळेस अचानक पावसाचा मारा होण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. यामुळे उघड्यावर बांधलेल्या गोठ्यांचे, झोपड्यांचे किंवा कच्च्या घरांचे मोठे नुकसान होऊ शकते.
या हवामान बदलाचा सर्वाधिक फटका कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांना बसण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी आत्तापर्यंत उन्हाची झळ जाणवत होती, तिथे आता थंडीची चाहूल लागलेली आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण तयार झाले असून हलकासा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच जळगाव, नंदुरबार, नगर, सांगली, पुणे, सोलापूर, बीड, परभणी, नांदेड, लातूर, चाराशिव या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी वादळसदृश स्थिती उद्भवू शकते.
घाटमाथ्याच्या भागांमध्ये म्हणजे नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये विशेष वादळाची शक्यता व्यक्त केली गेली आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
शेतकऱ्यांनी आपली काढलेली पिके जसे की गहू, हरभरा, भुईमूग इत्यादी योग्य ठिकाणी साठवावीत. गारपीट झाल्यास हातात आलेला पीकही नष्ट होण्याची शक्यता असते. आंबा, डाळिंब आणि द्राक्ष उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी फळांची झाडे प्लास्टिकने झाकून संरक्षण करावे. जनावरांना उघड्यावर बांधणे टाळावे आणि विजा कडकडताना झाडाखाली उभे राहणेही धोकादायक ठरू शकते.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मे महिन्यात हवामान बदलाचा अनुभव येत आहे. हवामानातील बदल वेळेवर ओळखून त्यानुसार योग्य ती काळजी घेणे आपल्याच हाती आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस सतर्क राहणे, हवामान खात्याचे अपडेट्स वेळोवेळी पाहणे आणि आवश्यक त्या उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.