या जिल्ह्यासाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर ! लगेच पहा पात्र शेतकऱ्यांची यादी

By शेतशिवार टीम

Published On:

Follow Us
Heavy Rain Damage Compensation

Heavy Rain Damage Compensation : मंडळी सरकारकडून अतिवृष्टी, पुर, दुष्काळ, चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तींमुळे शेती पिकांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन, शेतकऱ्यांना पुढील हंगामात उपयोगी पडणाऱ्या निविष्ठा अनुदानाचा लाभ दिला जातो. या अनुदानाचे वितरण राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून एका हंगामात एकदाच करण्यात येते. सध्या हे अनुदान तीन हेक्टरपर्यंत दिले जात आहे.

पिक विमा आणि नुकसान भरपाई

जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये ढगाळ हवामान व सततच्या पावसामुळे वर्धा, अमरावती, अकोला, आणि बुलढाणा जिल्ह्यांतील संत्रा वर्गीय पिकांना मोठ्या प्रमाणात फळगळ झाली होती. या नुकसानीसाठी नागपूर व अमरावती विभागीय आयुक्तांनी शासनाकडे निधीची मागणी केली होती. 15 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत या मागणीवर निर्णय घेण्यात आला.

नुकसान भरपाईसाठी मंजूर निधी

25 मे 2025 रोजी शासनाने फळ पिकांच्या नुकसानीसाठी 16,583.08 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याचे जिल्हावार वाटप पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे.

  • वर्धा जिल्हा — 1,084.98 लक्ष रुपये
  • अकोला जिल्हा — 1,090.62 लक्ष रुपये
  • बुलढाणा जिल्हा — 945.65 लक्ष रुपये
  • अमरावती जिल्हा — 13,461.83 लक्ष रुपये

महत्त्वाची माहिती

शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन शासन निर्णय (GR) तपासावा व आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करावी.

शेतशिवार टीम

शेतीविषयक संपूर्ण माहिती इथे देण्यात येणार आहे. शेती निगडीत योजना , बाजारभाव तसेच शेतकऱ्यांना उपयुक्त हवामान अंदाज सुद्धा देण्यात येतील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment