मित्रांनो महाराष्ट्रात हवामानाने नवे वळण घेतले आहे. हवामान विभागाने राज्यात पुढील तीन दिवसांसाठी वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषता विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा मोठा धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे या भागांमध्ये हायअलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
गेल्या २४ तासांत राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाची नोंद झाली असून काही ठिकाणी वादळी वारे व विजांचा कडकडाटही पाहायला मिळाला. विदर्भातील ब्रह्मपुरी येथे तापमान तब्बल ४५.९ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुढील तीन दिवसांचा तपशीलवार अंदाज
२६ एप्रिल
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा अंदाज.
२७ एप्रिल
रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, जालना, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा.
२८ एप्रिल
नांदेड, लातूर, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट कायम राहणार आहे.
शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाचा इशारा
भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी सूचना हवामान विभागाने केली आहे.
नागरिकांसाठी आवाहन
वादळी वारे व विजांचा कडकडाट लक्षात घेता नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे व अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.