मंडळी राज्यात 2024 च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले होते. अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले होते. अखेर राज्य सरकारकडून नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली असून, एकूण 3178 कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विभागवार भरपाईचे वितरण
नाशिक, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती आणि नागपूर या विभागांतील शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईसाठी अर्ज मान्य करण्यात आले आहेत. यापैकी 1620 कोटी रुपये आधीच वाटप करण्यात आले असून, उर्वरित 1558 कोटी रुपयांचे वितरण सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
नुकसान भरपाई थेट खात्यावर जमा
शेतकऱ्यांना ही भरपाई थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जात आहे. त्यामुळे कोणत्याही मध्यस्थांशिवाय मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे.
स्टेटस कसे तपासावे?
शेतकऱ्यांनी आपली नुकसान भरपाईची स्थिती खालील अधिकृत वेबसाईटवर जाऊन तपासू शकतात.
https://pmfby.gov.in/